kolhapur News : पावसाचा फटका! 'पन्हाळा तालुक्यातील ३३४० शेतकरी सापडले आर्थिक संकटात'; अद्याप शासनाकडून भरपाई नाही..

Rainfall Wreaks Havoc in Panhala: अनुषंगाने कृषी व महसूल विभागाने पिकांची पाहणी करून नुकसान झालेल्या क्षेत्राचा अहवाल सादर केला आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळालेली नाही. नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
“Crops submerged, hopes shattered — Over 3,300 farmers in Panhala await help as rains devastate livelihoods.”
“Crops submerged, hopes shattered — Over 3,300 farmers in Panhala await help as rains devastate livelihoods.”Sakal
Updated on

सागर चौगले

माजगाव : पन्हाळा तालुक्यात मे महिन्यात झालेल्या मॉन्सूनपूर्व वादळी पावसामुळे हातातोंडाशी आलेली पिके उद्ध्वस्त झाली होती. मका, सूर्यफूल, भुईमूग, सोयाबीन आणि उन्हाळी भात आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुमारे ८८४४.७७ एकर क्षेत्रावरील पिकांना अवेळी पावसाचा फटका बसला आहे. या आपत्तीमुळे सुमारे ३३४० शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. परंतु शेतकरी शासनाकडून मिळणाऱ्या नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com