Kolhapur News: 'शेतकऱ्यांपाठोपाठ कंत्राटदारही मृत्यूच्या दाढेत'; ८१ हजार कोटींची बिले थकली, देणेकरी दररोज दारात

govt contractor : राज्यातील शेतकरी आत्महत्यांनंतर आता कंत्राटदारांच्या आत्महत्या सुरू झाल्या आहेत. हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. त्यामुळे सरकार आणखी किती बळी घेणार? असा सवाल कंत्राटदारांकडून उपस्थित केला जात आहे.
Contractors in Debt Trap: Massive ₹81,000 Crore Pending Payments
Contractors in Debt Trap: Massive ₹81,000 Crore Pending Paymentssakal
Updated on

सार्वजनिक बांधकाम विभागासह ग्रामविकास, जलजीवन मिशन, जलसंधारण, जलसंपदा, विशेष निधी, जिल्हा नियोजन, आमदारांचा निधी यामधील कामे केलेल्या राज्यातील १५ हजारांहून अधिक कंत्राटदारांची सुमारे ८१ हजार कोटींची बिले सरकारने थकविली आहेत. त्यामुळे हे कंत्राटदार रस्त्यावर आले आहेत. दररोज देणेकरी दारात येत आहेत. त्यांना काहीच देऊ शकत नाही, अशी खंत त्यांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे सर्व पर्याय संपल्यानंतर मनुष्य जो मार्ग अवलंबतो तो म्हणजे मृत्यूला कवटाळण्याचा. त्याची सुरुवात तांदुळवाडी (ता. वाळवा, जि. सांगली) येथील हर्षल पाटील या अभियंता कंत्राटदाराच्या रूपाने झाली आहे. त्यांच्या व्यथा मांडणारी ही मालिका...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com