

Crop Damage in Sangli
esakal
सांगली जिल्ह्यातील शेतीला मोठा फटका – सांगली जिल्ह्यातील २९१ गावांतील ५१,३८७ हेक्टर शेती अतिवृष्टीमुळे बाधित झाली असून, ९६ हजारांहून अधिक शेतकरी या आपत्तीने प्रभावित झाले.
सर्वाधिक फटका दुष्काळी तालुक्यांना – कवठेमहांकाळ, आटपाडी, तासगाव या दुष्काळी तालुक्यांना सर्वाधिक नुकसान झाले. पिके, बागायती आणि फळबागा पाण्यात बुडून नासधूस झाल्या.
शासनस्तरावर पंचनामे सुरू – महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाने संयुक्त पंचनामे सुरू केले असून, अंतिम अहवालानुसार शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय घेतला जाणार आहे.
Sangli Crop Damage : सांगली जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २६) रात्री आणि शनिवारी (२७) दिवसभर झालेली अतिवृष्टी आणि मुसळधार पावसाने जिल्ह्यातील ५१ हजार ३८७ हेक्टर शेती बाधित झाली आहे. दुष्काळी कवठेमहांकाळ, आटपाडी, तासगाव तालुक्यांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला. सुमारे ९६ हजार १८६ शेतकरी या पावसाने बाधित झाले असून, त्यांच्या थेट बांधावर जाऊन पंचनामे करण्याची प्रक्रिया महसूल, ग्रामविकास आणि कृषी विभागाने संयुक्तपणे सुरू केली आहे. त्याचा अंतिम अहवाल महत्त्वाचा असेल.