
कोल्हापूर - इतर जिल्ह्यांत जाण्यासाठी ई-पास देण्याची प्रक्रिया ऑनलाईन आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागत नाही, तरीही पास घेण्यासाठी कार्यालयात गर्दी होत आहे.सुट्टीचा दिवस असतानाही पास मिळण्यासाठी गर्दी केली जात आहे. या ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून केले आहे.
जिल्ह्यात येण्यासाठी किंवा बाहेर जाण्यासाठी काय प्रक्रिया आहे हे विचारण्यासाठी अनेक व्यक्ती जिल्हाधिकारी कार्यालयात येत आहेत. त्यामुळे तेथील खांबावरसुद्धा ई-पास घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया काय आहे. त्याची लिंक काय आहे, याची माहिती चिटकवली आहे. ही माहिती घेऊन नागरिक ऑनलाईन अर्ज करीत आहेत. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर जिल्हा प्रशासनाची संबंधित यंत्रणा त्याला परवानगी देते. ज्यांच्याकडे उचित कारण नाही किंवा अपुरी माहिती असते, अशांचे अर्ज निकाली काढून परवानगी नाकारली जाते. यासाठी कोणीही जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. तरीही अनेक व्यक्ती जिल्हाधिकारी कार्यालयात ई-पास केव्हा मिळणार याची चौकशी करण्यासाठी गर्दी करीत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.