

social activist
sakal
कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषकांच्या हक्कांसाठी दीर्घकाळ लढा देणारे महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांच्या निधनामुळे सीमा आंदोलनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी सीमा लढा अधिक जोमाने पुढे नेणे आवश्यक असून, कोल्हापुरातून ही चळवळ नव्याने बळकट करूया, त्यासाठी सर्वांचा सहभाग हीच दळवी यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत शिवसेना (उद्धव ठाकरे गट) सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी व्यक्त केले.