
Uddhav Thackeray Leadership Crisis : कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना उद्घव बाळासाहेब ठाकरे पक्ष अडचणीत आहे; मात्र तरीही ठाकरेसेनेत आजही अंतर्गत दुफळी कायम आहे. पुनर्रचनेनंतरही अंतर्गत वाद मिटविण्यात नेते अपयशी ठरले आहेत. हीच दुही कायम राहिल्यास त्याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकीत बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.