
सुनील पाटील
कोल्हापूर : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात ४५ हजार घरकुले मंजूर झाली आहेत. त्यानुसार ६७ कोटी रुपयांचा पहिला हप्ता लाभार्थांच्या बँक खात्यावर जमा झाला आहे. दरम्यान, पहिला हप्ता जमा होऊन अडीच महिने उलटले तरीही जिल्ह्यातील ३६ हजार लाभार्थ्यांनी अजूनही घरकुलाची पायाखोदाईही केली नसल्याचे चित्र आहे.