Prakash Abitkar joins farmers in Kolhapur
esakal
कोल्हापूर : ना कोणता डामडौल, ना कोणता प्रोटोकॉल पाळत पालकमंत्री प्रकाश आबिटकर थेट शेतातील चिखलात उतरले. शेतकऱ्यांच्या बरोबरीने त्यांनी भाताची रोप लावण केली, रोटर फिरवला. काल दुपारी बांधावरच झुणका-भाकरीचा आस्वाद घेतला. एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवत त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून (My One Day for Farmers initiative Kolhapur) घेतले. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांनीही शेतात प्रत्यक्ष काम करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.