
कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाची संततधार आजही सुरू राहिली. तसेच धरण क्षेत्रातही जोरदार हजेरी लावल्याने धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू राहिला. यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील १८ बंधारे पाण्याखाली जाऊन वाहतूक विस्कळीत झाली. तर पंचगंगा नदीची पाणीपातळी रात्री २७ फूट चार इंच इतकी होती. राधानगरी धरणाचे चारही दरवाजे खुले झाले असून, त्यामधून ७२१२ क्युसेक विसर्ग सुरू राहिला. त्याचबरोबर धामणी धरणातून ३५८८, घटप्रभा धरणातून २५३१, दूधगंगा धरणातून ८५००, जांबरे धरणातून ५१३ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.