म्हाकवे : आलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास परवानगी मिळाल्यास कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील काही भागाला पुराचा फटका बसणार आहे. येथील शेतकरी (Farmer) उद्ध्वस्त होतील. त्यामुळे आलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास महाराष्ट्र इरिगेशन फेडरेशनचा (Maharashtra Irrigation Federation) कायमच विरोध राहील’, अशी माहिती माजी आमदार संजय घाटगे (Sanjay Ghatge) यांनी पत्रकार परिषदेत दिली. केनवडे (ता. कागल) येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.