इस्लामपूर : बंद कारखान्यांबाबत धोरण ठरवू

शरद पवार; साखर कामगार मेळाव्यात कृतज्ञता सत्कार
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी आज येथे दिली
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी आज येथे दिलीsakal

इस्लामपूर: बंद सहकारी साखर कारखाने सुरू करण्याबाबत मंत्री व कारखानदार- कामगार प्रतिनिधींबरोबर चर्चा घडवून आणू, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी आज येथे दिली. राजारामबापू साखर कारखाना कार्यस्थळी आयोजित साखर कामगार मेळाव्यात ते बोलत होते.

या वेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील, कामगारमंत्री हसन मुश्रीफ, खासदार श्रीनिवास पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री विश्‍वजित कदम, सर्वश्री आमदार मानसिंग नाईक, सुमन पाटील, अरुण लाड, राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस शंकरराव भोसले आदी उपस्थित होते.

यावेळी साखर कामगारांच्या वतीने १२ टक्के पगारवाढ देण्याच्या निर्णयाबाबत सकारात्मक योगदानाबद्दल श्री. पवार यांचा संघटनांच्या वतीने सत्कार झाला. महिन्याभरातच अशी बैठक होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

श्री. पवार म्हणाले, ‘खासगी साखर कारखान्यांपासून दृष्टी घेऊन राज्यातील सहकारी साखर कारखानदारी विस्तारली. यशवंतराव, वसंतदादा, राजारामबापू पाटील, तात्यासाहेब कोरे अशा राज्यभरातील सहकार धुरिणांनी त्यासाठी योगदान दिले. आता खासगी आणि सहकारी कारखान्यांमध्ये स्पर्धा आहे. गुणात्मक बदल होत आहेत. साखरेबरोबरच, वीज व इथेनॉलसह अनेक सहउत्पादने होत आहेत. एके काळी राज्यात सर्वात मोठा कापड गिरण्यांच्याचा उद्योग होता. गिरणगाव, लालभागात १२० कापड गिरण्या आणि २ लाख गिरणी कामगार होते. यामध्ये पश्‍चिम महाराष्ट्र व कोकण भागातील संख्या मोठी होती. आज गिरणगावात फक्त एक गिरणी तीही कमी कामगारात सुरू आहे. मात्र, साखर उद्योग अनेक आव्हानांना सामोरे जात टिकून आहे. तो वाढतो आहे.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘सहकार चळवळ पुढे न्यायाची असेल, तर खरे बोलावे लागेल. नोकरभरती मुळावर उठली आहे. अतिरिक्त नोकरभरती केल्यास संघटनांनी विरोध केला पाहिजे. सहकार खात्यानेही बंधने घातली पाहिजेत. अडचणीत साखर कारखान्यांनाबाबत चर्चेने मार्ग काढू.’ मंत्री जयंत पाटील, विश्‍वजित कदम, पी. आर. पाटील, अध्यक्ष तात्यासाहेब काळे, कार्याध्यक्ष राऊ पाटील आदींची भाषणे झाली.

कामगार, शेतकऱ्यांचे हित जोपासा

वसंतदादा इन्स्टिट्यूटमध्ये कामगारांच्या दुसऱ्या पिढीला तांत्रिक प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. हे आशादायक चित्र एकीकडे असताना, कामगारांना पगार मिळत नाही, आकृतिबंधपेक्षा नोकरभरती याबद्दल सहकार खात्याने कडक निर्णय घेतले पाहिजेत. दिवंगत कामगार नेत्यांनी साखर कामगारांचे आणि शेतकऱ्यांचेही हित जपले. हे पुढेही सुरू राहावे, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com