साधारणपणे मे महिन्यात पाणीसाठ्यात अपेक्षित घट झाल्यानंतर ग्राउंटिंग काम अधिक जोमाने सुरू राहणार आहे. गळती प्रतिबंधक उपाययोजनेचे काम पुढील दोन वर्षे सुरू राहणार आहे.
राधानगरी : काळम्मावाडी धरण गळती (Kalammawadi Dam Leak) रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ग्राउंटिंग उपायोजनेचे पहिल्या टप्प्यातील काम आता पूर्णत्वाच्या मार्गावर आले आहे. आधुनिक तंत्रज्ञानानुसार हे काम करण्यात येत आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत ग्राउंटिंगचे ५० टक्के काम पूर्ण होईल, असा अंदाज जलसंपदा विभागाच्या (Water Resources Department) सूत्रांनी वर्तविला आहे.