Kalicharan Maharaj: हिंदूंना फालतूची सहिष्णुता शिकवून त्यांचा नाश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळं राष्ट्रासाठी सहनशीलतेचा त्याग केला पाहिजे, असं विधान स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आणि कायम वादग्रस्त विधानांमुळं चर्चेत येणारे कालिचरण महाराज यांनी केलं आहे. कोल्हापुरात हिंदू जनजागृती समितीच्या आंदोलानाला भेट दिल्यानंतर त्यांनी इथं संबोधित करताना हे विधान केलं. यावेळी त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराची मागणीही केली.