

Human Welfare Must Emerge From Knowledge Says Dr Bhushan Patwardhan at Three Book Launch by Sakal Prakashan
sakal
कोल्हापूर : ‘लहान मुलांच्या पोशाखात, आहारात आणि बोलण्यात भारत दिसत नाही. पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव त्यांच्या वर्तनावर वाढत आहे. अशा काळात आपल्या परंपरा आणि संस्कृतीची शिकवण त्यांना देणे आवश्यक आहे. त्यासाठी विज्ञानाची दिशा प्रज्ञानाकडे नेण्याची गरज आहे. प्रज्ञानातून मानवकल्याणाचा भाव जागृत होईल’, असा विश्वास राष्ट्रीय संशोधक डॉ. भूषण पटवर्धन यांनी आज येथे व्यक्त केला.