
- संदीप खांडेकर
कोल्हापूर : स्मार्ट वीज मीटर बसविल्यानंतर वीज बिल किती येणार, याचा उलगडा न झाल्याने गिरणी मालक अस्वस्थ आहेत. घटत्या कमाईचे ग्रहण व्यवसायाला लागत असल्याने काहींनी थेट या व्यवसायाला रामराम ठोकला आहे. पिठाचे बारीक कण श्वासावाटे आत गेल्यानंतर श्वसनाच्या आजारांसाठी खर्चाच्या गणिताचा ताळमेळ कसा बसवणार, हा त्यांच्यासमोरील प्रश्न आहे. त्यातही कुशल कारागिरांचा तुटवडा असल्याने गिरणीमालक अक्षरश: वैतागले आहेत.