

Kolhapur City Expansion
esakal
कोल्हापूर: ‘‘शहराचा सुनियोजित विकास करण्यासाठी हद्दवाढ गरजेची आहे. हद्दीबाहेरील लोकांच्या ज्या काही अडचणी असतील, त्या शंभर टक्के सोडवल्या जातील’’, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बहुचर्चित कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी सकारात्मकता दाखवली. ‘शहराकरिता जो-जो विचार केला जाईल, तो टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जाईल’, असे आश्वासनही त्यांनी दिले.