Debt Relief Policy : राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनांवरून कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. वारंवार कर्ज थकवणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची कर्जमाफी, वेळेत कर्जफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन
कोल्हापूर : राज्य शासन जाहीर करत असलेल्या कर्जमाफीचा सर्वाधिक लाभ वारंवार कर्ज बुडविणाऱ्या शेतकऱ्यांनाच होत आहे. जिल्ह्यात ४३ हजार शेतकरी थकबाकीदार असून, दोन लाख २५ हून अधिक शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड केली आहे.