Why Kolhapur farmers stopped highway construction work
esakal
कोल्हापूर : "आमची शेती गेली, तीन वर्ष झाली तरी भरपाई मिळालेली नाही. आता आम्ही खाणार काय आणि जगणार कसे? आमची जमीन तरी परत द्या, नाहीतर आम्हाला थेट जेसीबी मशीनखाली घालून मारून टाका!" अशा अत्यंत संतप्त भावना व्यक्त करत दोनवडे आणि साबळेवाडी येथील शेतकऱ्यांनी कोल्हापूर-गगनबावडा राष्ट्रीय महामार्गाचे काम आज बंद पाडले.