
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील उपोषणानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सातारा गॅझेट लागू करण्याचं आश्वासन राज्य सरकारने दिलेलं आहे. मात्र कोल्हापूर गॅझेटचा नवीनच मुद्दा पुढे येतोय. या गॅझेटमध्ये मराठा समाजासाठीचा मोठा पुरावा सापडला असल्याचं म्हटलं आहे.