Kolhapur News : निरक्षर ऊसतोड कामगारांना मिळणार शिक्षणाचे धडे; साखर आयुक्तांचे कारखान्यांना आदेश

केंद्र पुरस्कृत ‘उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम’ राज्यात सन २०२२ ते २०२७ या कालावधीत सुरू आहे. १५ व त्यापुढील वयोगटातील असाक्षरांसाठी प्रौढ शिक्षण ऐवजी ‘सर्वांसाठी शिक्षण’ या नावाने हा कार्यक्रम सुरू आहे.
Illiterate Sugarcane Workers to Receive Education Lessons
Illiterate Sugarcane Workers to Receive Education LessonsSakal
Updated on

कोल्हापूर : राज्यात साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर ऊसतोडणीसाठी स्थलांतरित झालेल्या निरक्षर कामगारांचे शिक्षण अखंडित सुरू रहावे. यासाठी कारखाना परिसरात त्यांच्यासाठी अध्ययन-अध्यापन वर्ग सुरू करावेत, असे आदेश साखर आयुक्त दीपक तावरे यांनी राज्यातील सर्व साखर कारखान्यांना दिले आहेत. त्यामुळे राज्यातील ९६ सहकारी व ९३ खासगी, अशा एकूण १८९ साखर कारखाना परिसरातील फडात ऊसतोडणी बरोबरच शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com