Kolhapur Cleanliness : जलतीर्थांनी घेतला मोकळा श्वास;कोल्हापूरकरांच्या तीन पिढ्यांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम
Gadge Baba Jayanti : दोन तासांत तलाव, घाट आणि विहिरी चकचकीत झाल्या आणि पर्यावरण रक्षणाचा ठाम संदेश देत ‘स्वच्छ कोल्हापूर’चा निर्धार पुन्हा अधोरेखित झाला. सकाळच्या कोवळ्या उन्हात तीन पिढ्या एकत्र येत शहरातील पंधराहून अधिक जलतीर्थांची स्वच्छता केली.
कोल्हापूर : सकाळच्या कोवळ्या उन्हाच्या साक्षीने कोल्हापूरकरांच्या तीन पिढ्या एकवटल्या. शहर आणि परिसरातील पंधराहून अधिक जलतीर्थांच्या स्वच्छतेसाठी त्यांनी हातात हात गुंफले आणि अवघ्या दोन तासांत ही जलतीर्थे चकचकीत झाली.