Ramdas Athawale
esakal
कोल्हापूर : ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election) आगामी काळात होणार आहेत. यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आरपीआय) महापालिका निवडणुकीत पाच, तर जिल्हा परिषदेत तीन जागा द्या. तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीत ८ ते १० जागा मिळाव्यात,’ अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली. तसेच याबाबत खासदार धनंजय महाडिक आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी चर्चा केली असल्याचेही त्यांनी सांगितले. शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.