Kolhapur News: 'कोल्हापुरात कर्णकर्कश आवाजाचा इमारतींनाही धोका'; ‘अनुनाद परिणामा’मुळे काचा, भिंतींना तडे

Cracks in Buildings Linked to Excessive Noise: गणेश विसर्जन मिरवणुकीला सकाळपासूनच प्रारंभ होतो. सुमारे १२ तासांपेक्षा जास्त ही मिरवणूक चालते. ढोल पथक असो किंवा कर्णकर्कश आवाजाची ध्वनी यंत्रणा यातून सुमारे २५० ते ५०० डेसिबलपर्यंत आवाज जातो. दिवसभराच्या आवाजामुळे तेथे अनुनाद परिणाम दिसतो.
Excessive noise vibrations cause cracks in walls and glass due to resonance effect, raising building safety concerns.
Excessive noise vibrations cause cracks in walls and glass due to resonance effect, raising building safety concerns.Sakal
Updated on

-ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर: मिरवणुकांत ध्वनी यंत्रणेचा आवाज कर्णकर्कश असतो. त्याचा परिणाम केवळ सजिवांवर होतो, असे नाही, तर इमारतींवरही होतो. या कर्णकर्कश आवाजामुळे त्या परिसरात अनुनाद परिणाम (रेझोनन्स इफेक्ट) तयार होतो. परिणामी, घरांच्या काचा फुटतात. भिंतींना तडे जातात. मिरवणूक मार्गावरील धोकादायक आणि जीर्ण इमारती पडण्याची शक्यता असते. हा धोका लक्षात घेऊन पोलिस, प्रशासनाने गणेश मिरवणुकीत आवाजाच्या मर्यादेचे काटेकोर पालन करण्यासाठी नियोजन करणे अत्यावश्यक आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com