Kolhapur Parking Crisis
sakal
कोल्हापूर
Kolhapur City : अंबाबाई मंदिर परिसरात वाहतूक कोंडीचा कहर; महापालिका-वाहतूक शाखेचे अपयश उघड
Kolhapur Parking Crisis : भाविकांचे शहर असलेल्या कोल्हापुरात पार्किंगचाच अभाव; पर्यटन विकासाला अडथळा, बहुमजली पार्किंगचे प्रकल्प रखडले; विरोध, विलंब आणि नियोजनशून्य कारभार. पार्किंग वाढविल्याशिवाय शिस्त अशक्य; नागरिक, अभ्यासकांकडून ठोस उपायांची मागणी
कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामुळे देशभरातील भाविक कोल्हापुरात येतात. पर्यटन स्थळ म्हणून कोल्हापूरचा विकास होत आहे. तरीही भाविकांसाठी पार्किंगची व्यवस्था अपेक्षेनुसार नाही. नियोजनाच्या अभावामुळे पार्किंगचा बट्ट्याबोळ झाला आहे. भाविक, स्थानिक नागरिकांकडून याबाबत प्रचंड असंतोष आहे. पार्किंगच्या जागा वाढवणे आणि सध्या सुरू असलेले कामे लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे.
- लुमाकांत नलवडे

