

Kolhapur Railway Station
esakal
कोल्हापूर: रेल्वे प्रवाशांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असून, रेल्वे गाड्यांमध्ये कोणत्याही तांत्रिक उणिवा राहणार नाहीत, याची दक्षता घ्या. सुरक्षेबाबत निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा मध्य रेल्वेचे पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश वर्मा यांनी रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला.