Maharashtra Education Policy
esakal
कोल्हापूर : सुधारित संचमान्यता निकषानुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याचे आदेश शासनाने (Maharashtra Education Policy) दिले. नव्या संचमान्यता निकषामुळे राज्यात हजारो शिक्षक पदे कमी होणार आहेत. राज्यातील डोंगरी, दुर्गम, आदिवासी व नक्षलग्रस्त भागांतील कमी पटांच्या शाळांना याचा मोठा फटका बसणार आहे. अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांचे रिक्त जागी समायोजन होईल. परंतु, शिक्षक पदे कमी झाल्याने भविष्यात शिक्षक भरती होण्याची शक्यता कमी आहे. (Teacher Sanction Norms Maharashtra)