
आजरा (कोल्हापूर) : आंबेओहळ प्रकल्पाचा श्रेयवाद बाजूला ठेवून प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन प्राधान्याने कसे होईल व पाणी कसे अडवले जाईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आंबेओहळवरून सुरू केलेले राजकारण थांबवावे, असे आवाहन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक चराटी यांनी केले. विश्रामगृहावर भारतीय जनता पक्षाच्या वतीने तालुक्यातील प्रकल्पांबाबत चराटी यांनी भूमिका स्पष्ट केली.
संघटन सरचिटणीस श्रीपती यादव म्हणाले, ‘‘त्या वेळचे पाटबंधारे मंत्री महादेवराव शिवणकर व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याकडे पाठपुरावा केला. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडेही पाठपुरावा केला आहे. असे असताना सत्ताधारी मंडळी भाजपचा धरणाला विरोध असल्याचा अपप्रचार करीत आहेत.’’ तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार, तालुका चिटणीस अतिशकुमार देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. माजी तालुकाध्यक्ष अरुण देसाई, युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस अनिरुद्ध केसरकर, सुरेश देसाई उपस्थित होते.
श्रेयवादासाठी सत्ताधाऱ्यांकडून प्रकल्पांचे राजकारण केले जात आहे. सर्फनाला, उचंगी, आंबेओहळ हे तीनही प्रकल्प मार्गी लावून शेतकऱ्यांना पाणी देणे गरजेचे आहे. ही जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे.
- अशोक चराटी, जिल्हा उपाध्यक्ष, भाजप
संपादन- अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.