

कोल्हापूर : जिल्ह्यात आज मॉन्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळाले. यंदा लवकरच हा पाऊस सुरू झाल्याने शेतीची कामे खोळंबून शेतकरी हवालदिल झाल्याचे दिसून आले. त्यामुळे रोहिणीचा पेरा चुकण्याची चिन्हे आहेत. पंचगंगेच्या पाणी पातळीतही वाढ झाल्याने राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी १४ फूट आठ इंचांवर पोहोचली. तसेच पावसाने राधानगरीत १५ जणांच्या घरे, शेडवरील पत्रे कोसळून सुमारे एक लाख ७० हजारांचे नुकसान झाले.