

NCP and Congress leaders react as election
sakal
कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची सहानुभूती, जिल्ह्यातील पक्षनेतृत्वाची जागा वाटपात अचूकता, ज्या-त्या भागातील उमेदवारांचा वैयक्तिक प्रभाव, शाहूवाडीत, करवीर तालुक्यात दिलेल्या योग्य उमेदवारांमुळे जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी ग्रामीण भागात सर्वात मोठा पक्ष ठरला, तर सत्ताधाऱ्यांविरोध गावागावांतील तरुण आणि नवीन नेतृत्वाचा शोध घेत संधी दिल्याने काँग्रेस पक्ष नेतृत्वावर विश्वास ठेवत गाव गाड्यातील लोकांनी काँग्रेस पक्षालाही बळ देणारे मताधिक्य दिले आहे.