कोल्हापूर : NDRF कडून ६०० जणांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

साखर कारखान्याच्या शेड्समध्ये दिला तात्पुरता आश्रय
Kolhapur news
Kolhapur news

कोल्हापूर जिल्ह्यात जिथं पुराचा जोरदार फटका बसला आहे. या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बलाची (NDRF) टीम पोहोचली असून मदत कार्य सुरु झालं आहे. NDRFच्या जवानांनी पूराचा फटका बसलेल्या ६०० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केलं आहे. करवीर तालुक्यातील आंबेवाडीत गंभीर पूर परिस्थितीत NDRFच्या पथकाकडून मदत व बचाव कार्य सुरु आहे. (NDRF relief work begins in Kolhapur 600 people evacuated aau85)

पूराचा फटका बसलेल्या या ६०० नागरिकांना साखर कारखान्यातील मोकळ्या शेड्समध्ये तात्पुरते स्थलांतरीत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील राजापूर आणि कुरुंदवाड गावांमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने या गावांना मोठा फटका बसला.

Kolhapur news
मोठी घोषणा! तळीये गाव म्हाडा वसवणार - गृहनिर्माण मंत्री आव्हाड

दरम्यान, ब्लॉक व्यवस्थापकांच्या मदतीनं NDRFच्या टीमनं तीन गावातील नागरिकांची पूराच्या पाण्यातून सुटका केली आहे, अशी माहिती NDRFचे निरिक्षक शिवप्रसाद यांनी दिली. अद्यापही पूराचा मोठा फटका बसलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी NDRFचं काम सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com