

Panchganga Pollution
esakal
कोल्हापूर: एकूण सांडपाण्यापैकी ५६ टक्के सांडपाणी थेट पंचगंगा नदीमध्ये आजही जाते. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे (एसटीपी) काम सहा महिने विलंबाने सुरू झाले आहे. नदी प्रदूषण कमी करणे हे केवळ प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे काम नाही, तर ती सर्व विभागांची जबाबदारी आहे. त्यामुळे २०२७ पर्यंत सर्व एसटीपीची कामे पूर्ण झाली पाहिजेत, असे आदेश पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे दिले.