कोल्हापूर : कोल्हापुरातल्या पन्हाळा तालुक्यातील गोठे गावातील दांपत्याने आपल्या 12 वर्षांच्या मुलासह कुंभी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. दीपक शंकर पाटील, वैशाली दीपक पाटील आणि विघ्नेश दीपक पाटील असे या तिघांचे नाव आहे. सामुहिक आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे गावात शोककळा पसरली आहे.
प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार:
गोठे गावाच्या शेजारी एका शेतात असलेल्या घरी हे कुटुंब राहत होते. रात्री ९ नंतर तिघांनी ही जाऊन कुंभी नदीत उडी मारल्याची प्राथमिक माहिती आहे. आज सकाळी 8 च्या सुमारास नदी काठी असलेल्या चपलावरून ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांनी या तिघांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. दरम्यान, यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये अशी चिट्ठी सुद्धा मिळून आल्याची माहिती मिळत आहे.
काय होते त्या चिठ्ठीत
जीवनात अयशस्वी ठरलो. आम्हाला माफ करा. कोणालाही जबाबदार धरू नये. प्रदीप घराकडे लक्ष ठेव. संजू, अक्का, अमर अण्णाला सांभाळा. कोणीही तक्रार करू नये. मी, वैशाली व विघ्नेश स्वखुशीने आत्महत्या करत आहोत. दीपक माफ करा चुकलो. अशी चिठ्ठी लिहून दांपत्याने आपले जीवन संपवले.
Edited By- Archana Banage
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.