आता बेघरांना मिळणार हक्काचा निवारा! 'आवास'च्या अनुदानात 50 हजारांची वाढ, लाभार्थ्यांच्या खात्यावर 12 कोटी जमा

Pradhan Mantri Awas Yojana : शासनाने सौरऊर्जा यंत्रणा व बांधकामासाठी अनुदानात ५० हजारांची वाढ केली आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी दोन लाखांचा निधी मिळणार आहे.
Pradhan Mantri Awas Yojana
Pradhan Mantri Awas Yojanaesakal
Updated on

कळंबा : केंद्र शासन (Central Govt) पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (Pradhan Mantri Awas Yojana) ग्रामीण टप्पा दोन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेतून करवीर तालुक्यातील ११८ गावांमधील ४ हजार ६८८ लाभार्थ्यांच्या खात्यावर बारा कोटी २३ लाख पाच हजार रुपयांचे अनुदान जमा झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बेघरांना हक्काचा निवारा मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com