Maharashtra Rain Update : गेलेला पाऊस पुन्हा कसा आला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा किती दिवस राहणार; हवामान तज्ञ काय म्हणतात?

Bay of Bengal Rain : : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुढील चार दिवस जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Maharashtra Rain Update

Maharashtra Rain Update

esakal

Updated on
Summary

वादळी वारे व मुसळधार पाऊस – बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाने सिंधुदुर्गला ‘ऑरेंज अलर्ट’ दिला.

दैनंदिन पावसाची आकडेवारी – रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ४.२९ मिमी पाऊस; लांजामध्ये ९ मिमी, दापोलीत ७.४२ मिमी अशा वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस नोंदला गेला.

शेतकऱ्यांची चिंता – हळव्या व पक्व भातपिकावर पावसाचा फटका बसू शकतो; नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना बांधबंदिस्ती काढून पाण्याचा निचरा करण्याचा सल्ला ग्रामीण मौसम सेवा केंद्राने दिला.

Weather Update Maharashtra : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुढील चार दिवस जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ऐन नवरात्रीत पडणाऱ्या पावसामुळे दांडिया खेळणाऱ्या तरुणाईचा हिरमोड झाला आहे. तसेच हळव्या भातशेतीची कापणीही रखडणार आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहावे, असे आवाहन केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com