
Shaktipeeth highway Kolhapur :‘लोकहिताचा असणारा शक्तिपीठ महामार्ग ६२ गावांतून जात आहे. यातील सर्वाधिक गावांतील शेतकरी शक्तिपीठ महामार्गाचे समर्थन करत आहेत. कोल्हापूरचा विकास होऊ नये, यासाठी काही राजकारणी प्रयत्न करत आहेत. त्यांचा विरोध डावलून लोकांच्या हितासाठी शक्तिपीठ मार्ग होणारच. यासाठी शुक्रवारी (ता. ११) मंत्रालयात बैठक होत आहे. या बैठकीसाठी योग्य नियोजन केले जाणार असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज दिली. शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.