कृषीपंप वीज बिल थकबाकीमुक्त योजनेत शेतकऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

कृषीपंप वीज बिल थकबाकीमुक्त योजनेत जिल्ह्यातील ७८ हजार ८०८ शेतकऱ्यांनी थकबाकी मुक्त योजनेत सहभाग नोंदविला.
Mahavitran
MahavitranSAKAL

कोल्हापूर : कृषीपंप वीज बिल थकबाकीमुक्त योजनेत जिल्ह्यातील ७८ हजार ८०८ शेतकऱ्यांनी थकबाकी मुक्त योजनेत सहभाग नोंदविला. त्यांनी थकबाकीपोटी ७२ कोटी ६१ लाख व चालू वीजबिलांच्या ४० कोटी ५३ लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यांना थकबाकीपोटी भरलेल्या रक्कमेएवढी, महावितरणकडून निर्लेखनद्वारे मिळालेली, विलंब आकार व व्याजातील सूट यापोटी एकूण ८९ कोटी ६ लाख रुपये माफ झाले आहेत.

Mahavitran
'वरद बाळा, ये रे परत.!'; वरदच्या फोटोपूजनवेळी आई-वडिलांची आर्त हाक

दरम्यान, ५५ हजार १४३ शेतकरी वीजबिलांमधून संपूर्णपणे थकबाकीमुक्त झाले आहेत. त्यांनी चालू वीजबिलासह थकबाकीच्या ५० टक्के रक्कमेचे एकूण ७५ कोटी ७५ लाख रुपये भरणा केला आहे. त्यामुळे सुधारित थकबाकीमध्ये त्यांना आणखी ५८ कोटी ६१ लाख रुपयांची सूट व संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळाली आहे.

कृषीपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून शेतकऱ्यांना कृषी पंप वीज बिल थकबाकीमुक्त योजनेत करण्यासाठी जुन्या थकबाकीत तब्बल ६६ टक्के सूट देण्यात येत आहे. शिल्लक थकबाकीपैकी ५० टक्के थकबाकी येत्या मार्च २०२२ पर्यंत भरल्यास उर्वरित ५० टक्के थकबाकीदेखील माफ करण्यात येत आहे.

Mahavitran
कलिवडे ग्रामस्थांचा जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा

गेल्या मार्चपासून महावितरणने कृषी पंप वीज धोरण २०२० च्या अंमलबजावणीला सुरवात केली. धोरणातील योजनेप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण १ लाख ४५ हजार ४६२ शेतकऱ्यांना थकबाकीमुक्त होण्याची संधी आहे. निर्लेखनाद्वारे महावितरणकडून मिळालेली सूट तसेच विलंब आकार व व्याजातील सूट अशी रक्कम वगळून या शेतकऱ्यांकडे ४११ कोटी १५ लाख सुधारित थकबाकी आहे.

यातील ५० टक्के थकबाकी तसेच चालू वीजबिलांचे १०२ कोटी ९२ लाख रुपयांचा भरणा येत्या मार्च २०२२ पर्यंत केल्यास थकबाकीची उर्वरित ५० टक्के रक्कम देखील माफ होणार आहे. शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभागी व्हावे व सोबतच चालू वीजबिलांचा नियमित भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

सद्यस्थितीत महावितरणची आर्थिक स्थिती अतिशय खालावली आहे. त्यामुळे थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभाग नाही व चालू वीजबिलांचा भरणा नाही, अशा शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा नाईलाजाने खंडित करण्याची कटू कारवाई करण्यात येत असल्याचे महावितरणचे प्रभारी मुख्य अभियंता अंकूर कावळे यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com