
Sharad Pawar Kolhapur : ‘मुंबईत पिंगा घालणाऱ्यांनाच पदे मिळतात, कार्यकर्त्यांकडे पदे नाहीत. केवळ गर्दी करायची असल्यावर आम्हाला निरोप येतो. हे बदलायला पाहिजे. तालुक्यातील कार्यकर्त्यांना वेळ द्या. जिल्ह्यात पक्षाचा एकही आमदार, खासदार नाही. आम्हाला ताकद देण्याचे काम वरिष्ठांनी केले पाहिजे’, अशा शब्दांत आज कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या दोन्ही निरीक्षकांचे कान टोचले.