माजगाव : ऊस उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात ऊस लागणीसाठी पारंपरिक कांडीऐवजी रोपांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल झपाट्याने वाढत आहे. .उत्पादनवाढ, रोगमुक्त ऊस आणि १०० टक्के उगवण या त्रिसूत्रीमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर रोपलागवडीला प्राधान्य देऊ लागले आहेत. परिणामी ऊस रोपवाटिकांमध्ये विविध वाणांच्या रोपांना मोठी मागणी वाढली असून, अनेक ठिकाणी रोपांची टंचाई जाणवू लागली आहे..Kolhapur News :१७–१८ महिन्यांचा आडसाली उस वेळेवर न तुटल्याने उत्पादनात मोठी पडझड; कारखानदारांवर शेतकरी संतप्त.परंपरागत कांडी लागवडीत उगवण कमी होते. याउलट रोपलागवडीत उगवण अधिक, वाढ एकसमान आणि वाढीचा कालावधी तुलनेने कमी असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. या पद्धतीमुळे आंतरपीक घेणे शक्य होते, तसेच उत्पादनात २० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ होत असल्याचे प्रगतशील शेतकरी सांगतात. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी कांडीऐवजी तयार रोपांच्या माध्यमातून लागवड करण्यास प्राधान्य देत आहेत. .अधिक साखर उतारा आणि चांगले उत्पादन देणाऱ्या ‘को– ८६०३२’सह नव्याने विकसित झालेल्या वाणांच्या रोपांना विशेष मागणी आहे. दर्जेदार आणि रोगमुक्त रोपे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची सध्या लगबग सुरू आहे..Kolhapur Farmer : बैलगाडीतून जाणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज; पण विमानाने फिरणाऱ्यांना कर्जमाफी उसदराच्या अन्यायावर रघुनाथ पाटीलांचा संताप उसळला!.नोव्हेंबर-डिसेंबरपासून ऊस तोडणी हंगाम सुरू झाल्यानंतर नवीन लागवडीसाठी रोपांची मागणी वाढते. मात्र यंदा अवकाळी पाऊस, हवामानातील बदल आणि मजूर टंचाई यामुळे रोपे तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळे आले आहेत. .परिणामी अनेक रोपवाटिकांवर ताण निर्माण झाला आहे. शिरोळ तालुक्यातील तमदलगे, जांभळी, बुबनाळ ही गावे ऊस रोपवाटिकांची केंद्रे म्हणून ओळखली जात आहेत. येथून महाराष्ट्रासह परराज्यांतूनही रोपांना मोठी मागणी आहे. मात्र मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने शेतकऱ्यांना वेळेत रोपे मिळणे अवघड झाले आहे. वाहतूक खर्चासह प्रति रोप २.२० रुपयांपासून पुढे दर आकारले जात आहेत. .काही शेतकरी स्वतःच्या शेतातच रोपे तयार करण्याकडेही वळले आहेत. ऊस उत्पादन वाढीसाठी शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत असून, वाढत्या मागणीनुसार रोपांचा वेळेत पुरवठा करणे हे रोपवाटिकांसमोर सध्या मोठे आव्हान ठरत आहे. ऊस कांडीपासून लागण केल्यास १०० टक्के उगवण होत नाही. तसेच वेळेत दर्जेदार ऊस कांडी बियाणे मिळत नाही. रोपांपासून हमखास उगवण चांगली होऊन उत्पादन अधिक मिळते. म्हणून ऊस लागणीसाठी रोपांना लागण करत असतो.- बाजीराव कदम, ऊस उत्पादक शेतकरी.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.