औरंगजेबाची कबर उखडून टाकू, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. शिंदे साहेब तुम्ही फक्त तारीख सांगा. लाखो कार्यकर्ते आणि लागेल तेवढे जेसीबी घेऊन आम्ही येतो, असे टी. राजासिंह भाषणात म्हणाले.
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात त्यांच्या नावाचा आदर केला जावा, यासाठी मोर्चा काढावा लागतो, हे खेदजनक आहे. सरकारने पुढील महिन्याभरात विद्यापीठाचे (Shivaji University) नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे करावे; अन्यथा आम्ही विधानसभेवर मोर्चा काढू, असा इशारा तेलंगणचे आमदार टी. राजासिंह (T. Rajasingh) यांनी येथे दिला.