‘जलजीवन’च्या बैठकीत अभूतपूर्व गोंधळ

‘जलजीवन’च्या बैठकीत अभूतपूर्व गोंधळ

03327
कबनूर ः येथील जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेबाबत चर्चेसाठी बोलवण्यात आलेल्या बैठकीत वादावादीतून एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. (छायाचित्र ः टिपू सनदी,कबनूर)
--------------
‘जलजीवन’च्या बैठकीत अभूतपूर्व गोंधळ
कबनूरला ग्रामस्थ-सदस्यांत वादावादी; अधिकाऱ्यांनीही बैठक सोडली
कबनूर, ता. ९ ः येथील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर नळ पाणीपुरवठा योजनेबाबत चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत अभूतपूर्व गोंधळ झाला. एकाच वेळी अनेकांनी मांडलेली मते, ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य यांच्यातील वादावादी, एकमेकांच्या अंगावर धावून जाणे असे प्रकार घडल्याने बैठकीचा मूळ उद्देश बाजूला पडला. याला वैतागून अनेकांनी सभात्याग केला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभागाचे उपविभागीय अभियंता हेही बैठक सोडून गेले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच शोभा पोवार होत्या. जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत कबनूर नळ पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भात असलेल्या शंकाबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अधिकारी जे. डी. काटकर माहिती देत होते. त्यावेळी अनेक ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी प्रश्नांचा भडीमार केला. एकाच वेळी अनेकांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे प्रचंड गोंधळ उडाला. तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष अशोक पाटील यांनी एकावेळी एकाच व्यक्तीने प्रश्न विचारावा असे सांगितले. पण प्रश्न विचारण्यासाठी अनेक उत्सुक होते. त्यामुळे एकाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळण्याआधीच दुसरे प्रश्न विचारत होते.
माजी सरपंच उदय गीते यांनी प्रथम ग्रामपंचायत सदस्यांनी प्रश्न विचारावेत. त्यानंतर ग्रामस्थांना प्रश्न विचारू द्या, असे मत मांडले. माजी उपसरपंच सुधीर पाटील यांनी प्रश्नांचा भडीमार केला. अभियंत्यांनी खरी माहिती सांगितलीच नाही, असा आरोप केला. ग्रामपंचायत सदस्य सुधीर लिगाडे, वैशाली कदम यांनीही जाब विचारला. पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. एम. पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य जयकुमार कोले, बी. डी. पाटील, मधुकर मणेरे आदी उपस्थित होते.
---------------
आश्वासन नको जबाबदारी घ्या
नळपाणी योजनेतून नळधारकांना नळ कनेक्शन घेण्यासाठी आर्थिक भुर्दंड पडता कामा नये. योजनेची पाईपलाईन होत असताना खुदाई झालेल्या रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी योजनेमध्ये पुरेसा निधी नाही. योजनेमध्ये सोलर सिस्टिमचा समावेश असावा. वाढीव पाईपलाईनचा समावेश व्हावा याबद्दल आग्रह धरला. पण श्री. काटकर यांनी आपण प्रस्ताव पाठवून प्रयत्न करूया, असे आश्वासन दिले. मात्र आश्वासन नको जबाबदारी घ्या, असा आग्रह ग्रामपंचायत सदस्यांनी धरला. अखेर पाणीपुरवठा योजनेचा ठेकेदार आणि नेतेमंडळी, ग्रामपंचायत सदस्य व समितीचे सदस्य यांच्यामध्ये बैठक घेण्याचे ठरले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com