वाहतूक कोंडी केव्हा सुटणार?

वाहतूक कोंडी केव्हा सुटणार?

03485
कबनूर ः येथील मुख्य चौकात सातत्याने अशी वाहतुकीची कोंडी होत असते. (छायाचित्र ः पल्लवी फोटो, कबनूर)
-----------
वाहतूक कोंडी केव्हा सुटणार?
वाहनधारकांतून सवाल; कबनूरमधील रत्नाप्पाण्णा कुंभार चौक
रवींद्र पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कबनूर, ता. १२ ः येथील इचलकरंजी-कोल्हापूर रस्त्यावरील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना तिष्ठत राहावे लागत आहे. अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडी हा विषय गंभीर बनला आहे. त्यामुळे प्रवाशांचे नुकसान होत आहे. वाहतूक कोंडीचा हा प्रश्न कधी सुटणार, असा सवाल वाहनधारकांतून केला जात आहे.
या मुख्य चौकात इचलकरंजी-कोल्हापूर हा रस्ता खूप रहदारीचा आहे. त्याचबरोबर चौकातून चंदूर, रुई, इंगळी, पट्टणकोडोली, कोरोचीकडे जाणारे रस्ते तसेच साखर कारखाना रस्ता, डेक्कन भागाकडे जाणारा रस्ता, गावभागात जाणारे मुख्य रस्ते असल्याने हा चौक खूप रहदारीचा आहे. चौकातून गावातील नऊ शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची ये-जा असते. रस्त्याचे रुंदीकरण नाही. तसेच भाजीपाला, फळ व इतर विक्रेते यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. त्यामुळे चौकात सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असते. वाहतूक कोंडीमुळे छोटे-मोठे अपघातही होतात. बऱ्याच वेळा वाहतूक ठप्प झाल्याने रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ससेहोलपट होते. चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलिस नाही. वाहतूक कोंडी होऊन वाहतूक बराच वेळ ठप्प झाल्यानंतर वाहतूक पोलिस येतात. त्यावेळी वाहतूक कोंडी मोठी झालेली असते. येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी नागरिकांचा मोर्चा, रास्ता रोको आदी आंदोलने झालेली आहेत. त्याचबरोबर सातत्याने होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी यासाठी लोकप्रतिनिधी, वाहतूक पोलिस, ग्रामपंचायत प्रशासन यांच्यात बैठक होऊन चर्चेचे गुऱ्हाळ झालेले आहे; पण वाहतूक कोंडीच्या प्रश्नाचे गांभीर्य नसल्याने त्यावर ठोस निर्णय झाला नाही. म्हणून वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे ही काळाची गरज आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रवासी, नागरिक, विद्यार्थ्यांचे तसेच या चौकातील व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे; पण संबंधितांचे डोळे कधी उघडणार, हा वाहतुकीचा प्रश्न कधी सुटणार असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.
--------
सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे व्यापारावर खूप परिणाम होतो. वाहतूक कोंडीमुळे ग्राहक दुकानात येऊ शकत नाहीत. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
-अरविंद बाणदार, गोकुळ बेकरी, कबनूर.
-------------------
या चौकातून प्रवास करून विद्यार्थ्यांना दहावीच्या बोर्ड परीक्षेवेळी बोर्ड केंद्र असलेल्या शाळेत जावे लागते. विद्यार्थ्यांना परीक्षेला वेळेवर पोहोचवण्यासाठी पालक दुसऱ्या मार्गावरून दूरवरून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पाठवतात.
-एस. ए. पाटील, पालक, कबनूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com