कोल्हापूर.कंत्राटी पद भरतीचा शासन निर्णय मागे घ्यावा ..

कोल्हापूर.कंत्राटी पद भरतीचा शासन निर्णय मागे घ्यावा ..

कंत्राटी पद भरतीबाबत
संभाजी ब्रिगेडचे निवेदन
कोल्हापूर, ता. २७ : एकीकडे विद्यार्थ्यांना मेगाभरतीच्या नावाखाली गाजर दाखवण्याचा प्रकार होत असताना दुसरीकडे कंत्राटी पद भरतीबाबत शासन निर्णय काढून महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांची थट्टाच करत आहात. त्यामुळे तरुणाईच्या भावना लक्षात घेऊन १४ मार्च २०२३ रोजी काढलेला कंत्राटी पद्धतीवरच्या भरतीचा पदभरतीचा निर्णय शासन निर्णय तात्काळ रद्द करून महाराष्ट्रातील विविध विभागात रिक्त असलेली पदे एमपीएससीच्या माध्यमातून भरण्यासाठी प्रयत्न करावे. अन्यथा बेरोजगारांची फौज रस्त्यावर उतरेल व त्यातून निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न यासाठी शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. या निर्णयाची होळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केली. कंत्राटी पद्धतीवर विविध कार्यालयातील पद भरतीचा शासन निर्णय रद्द करावा अशा घोषणा सरकारचा निषेध करून सदर निवेदन नायब तहसीलदार नम्रता चौगुले यांना दिले. संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील, अभिजीत कांजर, राहुल पाटील, अभिजीत भोसले, मारुती भोळे, अमरसिंह पाटील,सचिन हंचनाळे, मनोज देसाई, शशिकांत साळोखे, सचिन सुतार, दिपक कडव यांची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com