पंचगंगेच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज

पंचगंगेच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज

लोगो ः रामभाऊ राशिनकर व्याख्यानमाला
------------
ich241.jpg
98293
इचलकरंजी ः रामभाऊ राशिनकर व्याख्यानमालेत पोपटराव पवार यांनी मांडणी केली.
-----------
पंचगंगेच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज
पोपटराव पवार; ‘ग्रामीण विकासाच्या नव्या वाटा’ वर व्याख्यान
इचलकरंजी, ता. २४ ः शेतातील मातीचे आणि नदीतील पाण्याचे आरोग्य सुधारले नाही तर माणसाच्या जीवनावर भीषण परिणाम होतील आणि भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही. पंचगंगा नदी आणि नदीकाठची माती सुद्धा प्रदूषित बनली आहे. त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे मत पद्मश्री पोपटराव पवार यांनी येथे केले.
येथील चाणक्य प्रतिष्ठान आणि श्री आर्य चाणक्य नागरी पतसंस्था यांच्यावतीने आयोजित रौप्य महोत्सवी रामभाऊ राशिनकर स्मृती व्याख्यानमालेत ‘ग्रामीण विकासाच्या नव्या वाटा’ या विषयावर पवार बोलत होते. पवार म्हणाले, ‘किटकनाशकाच्या अतिवापराने जमिनी खराब झाल्या असून शेतीचे उत्पादन घटत आहे. उत्पादन वाढीतून आर्थिक सुबत्ता आली, पण पाठोपाठ विविध आजार आले. कर्करोगामुळे संपत्ती दवाखान्यात संपत आहे. श्रीमंती आल्यावर संस्कार होत नाहीत. उलट व्यसने येतात. सुख सुद्धा संपुष्टात येते. पंजाबातील चंदीगड ते भटिंडा या रेल्वेला ''कॅन्सर ट्रेन'' अशी ओळख आहे. देशाला अन्नधान्य पुरवणाऱ्या पंजाबची अशी स्थिती आहे. जमिनी खराब झाल्यामुळे अशीच अवस्था पंचगंगा नदीकाठी बनत आहे. विकासाला सुद्धा संस्काराची जोड पाहिजे. भरड धान्य खाल्ल्याने कर्करोगामधून अनेक जण बाहेर पडले आहेत. कोरोनात घरचे अन्न सर्वांनी खाल्ले. सर्वांचे आरोग्य सुधारले. घरचा किचनकट्टा ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे.’
ग्राम सभेच्या आदेशाला पूर्वी सन्मान होता. आता वादासह वितंडवाद होत आहे. गळती पाहून थेट सरकारी पैसे गावात येत आहेत. यामुळे अनेक जण जागृत झाले आहेत. माहिती अधिकारातून लक्ष ठेवले जात आहे. पण लोकशाहीतील मतदानाच्या वेळी मतदान घटत आहे. दारू आणि जेवणाकडे डोळा ठेवून मतदान होते, ही शोकांतिका आहे. लोकांनी निसर्गावर प्रेम करावे. वृक्ष आणि पाणी याबाबत जागरूक रहावे, असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक आर्य चाणक्य पतचसंस्थेचे अध्यक्ष जवाहर छाबडा यांनी केले. महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राजेंद्र राशिनकर उपस्थीत होते. लायन्स क्लबच्या प्रांगणात झालेल्या या व्याख्यानास रसिकश्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती. पंडित ढवळे यांनी आभार मानले.
----------
घरोघरी आरोग्यदायी स्वयंपाक बनावा
घरोघरी आरोग्यदायी स्वयंपाक बनायला हवा. समस्येवर गावातूनच उत्तर मिळायला पाहिजे. गावे असुरक्षित होऊ देऊ नका. पैशाने निसर्ग बदलत नाही. दूषित मातीतील अन्नधान्य प्रदूषितच असते. सध्या ४० ते ४५ टक्के लोकांना चांगले अन्न आणि पाणी मिळत नाही हे वास्तव आहे, असे पोपटराव पवार यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com