विद्युत खांब मालिका १

विद्युत खांब मालिका १

जीवघेणा ‘करंट'' : १
.......

पावसाळ्याची सुरुवात झाल्यानंतर खराब झालेल्या वीजेच्या खांबाला स्पर्श होवून शेतकऱ्यांचा मृत्यू, जनावरांचा चारा काढण्यासाठी गेलेल्या माय-लेकरांचा शेतात तुटून पडलेल्या विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू अशा अनेक दुर्घटना जिल्ह्यात वारंवार घडतात. गंजलेले, सडलेले विजेचे खांब बदलेले नाहीत, खराब झालेल्या विद्युत तारा अनेक वर्षांपासून बदलेल्या नाहीत. परिणामी, पावसाळ्यात अशा खांबामध्ये वीज प्रवाहित होते किंवा खराब तारा वाऱ्याने शेतात पडतात. यामुळे शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे शासनाने आणि महावितरणने शेतातील असे विद्युत खांब आणि तारा बदलण्याची तस्दी घेतली पाहिजे. याच समस्येवर प्रकाश टाकणारी ही वृत्तमालिका आजपासून...


आला पावसाळा, शेतकऱ्यांनो जीव सांभाळा!
तुटलेल्या तारा, गंजलेल्या खांबाचा करंट ः हकनाक जातो बळी

सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ : जिल्ह्यात शेतीसाठी वीज प्रवाहित करणाऱ्यासाठी वापरलेल्या तारा आणि लोखंडी खांब कालबाह्य झाले आहेत. तारा आणि खांब खराब झाल्याच्या तक्रारी महाविरणकडे केल्या जातात. पण याची म्हणावी तशी दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे. परिणामी, पावसाळ्यात अशा विजेचा करंट लागून शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागत आहे.

ऊन, वारा, थंडी आणि पावसात शेतकऱ्यांना कामापासून सुटका नसते. पावसाळ्यात जनावरांसाठी चारा काढण्याचे काम सरार्स असते. जोरदार वाऱ्यामुळे किंवा पावसामुळे शेतातच विद्युत वाहिन्या तुटून पडलेल्या असतात. बारिका आणि सहजा-सहजी नजरेस न येणाऱ्या या तारांमध्ये शेतात पडल्यानंतरही विद्युत प्रवाह सुरु असतो. याची कल्पनाही त्यांना नसते आणि मशागती करताना अशाच उघड्या तारेवर पाय पडून शेतकऱ्यांना वीजेचा शाँक लागल्याने जीव गमवावा लागतो, तर काही गंभीर जखमी होतात. याची तात्पूरती दखल घेवून ‘ये रे माझ्या मागल्या’ या उक्तीनूसार महावितरणचे काम सुरु असते. वास्तविक शेतातील खराब झालेल्या तारा बदलण्याशिवाय आता पर्याय नाही. एकीकडे शेतकऱ्यांना विविध सवलती दिल्या पाहिजे. शेती उत्पादकता वाढली पाहिजे, अशी सरकारकडून घोषणा केली जाते. दुसरीकडे मात्र शेतात विद्युत तारेच्या माध्यमातून याच शेतकऱ्यांच्या मृत्यूचा सापळा तयार केला जात आहे. जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे शासन आणि महावितरण आता तरी डोळे उघडणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
.....
कोट
ासाप, विषारी किडे यांचा सामना करत शेतीचे काम करावे लागते. यातच, पावसाळ्यात शेतात तुटून पडलेल्या विजांच्या तारांचीही भीती असते. या विद्युत तारांची आणि खांबांची डागडूजी केलेली नसते. वास्तविक असे सर्व खांब बदलणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांना आपल्या जीवाला मुकावे लागत आहे.
- बंडोपंत पाटील, शेतकरी
....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com