गड-बळीराजा उपसाबंदी निवेदन

गड-बळीराजा उपसाबंदी निवेदन

उपसाबंदी दोन दिवस
पुढे ढकलण्याची मागणी

गडहिंग्लज, ता. ७ : हिरण्यकेशी नदीवर उद्यापासून (ता. ८) उपसाबंदी लागू होणार आहे. पण, तांत्रिक बिघाडामुळे भडगाव फिडरवरुन दोन दिवस वीजपुरवठा पूर्ण दाबाने झालेला नाही. त्यामुळे पिकांना पाणी देण्यात अडचणी आल्या आहेत. परिणामी, उपसाबंदी दोन दिवसांनी पुढे ढकलावी, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेतर्फे केली आहे. पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.
भडगाव शेती फिडरवरुन जरळी, मुगळी व नूल या गावांना वीजपुरवठा होतो. ३ जूनला झालेल्या वादळामुळे भडगाव फिडरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे दोन दिवस पूर्ण दाबाने वीजपुरवठा करता आलेला नाही. वीज नसल्याने पिकांना पाणी देण्यात अडचणी आल्या होत्या. त्यात आता उद्यापासून हिरण्यकेशी नदीवर उपसाबंदी लागू होणार आहे. त्यामुळे पाण्याअभावी पिके वाळणार आहेत. यात शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे उपसाबंदी दोन दिवसांनी पुढे ढकलून शेतकऱ्यांना सहकार्य करावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील यांनी हे निवेदन दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com