मुश्रीफ पत्रपरीषद २

मुश्रीफ पत्रपरीषद २

फोटो - मुश्रीफ
------------
हद्दवाढीबाबत दिवाळीनंतर
सर्वांशी चर्चेने निर्णय घेऊ
मुश्रीफ ः इचलकरंजीला शुद्ध पाणी देण्याची जबाबदारी माझी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः कोल्हापूर शहर हद्दवाढीबाबत दिवाळीनंतर सर्व लोकांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्वासन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे दिले. ते म्हणाले, ‘‘इचलकरंजीला शुद्ध पाणी पुरवठा देण्याची जबाबदारी माझी आहे. ती पूर्ण केली जाईल.’’
ते म्हणाले, ‘‘कोल्हापूर शहराजवळील तसेच शहर व महापालिकेच्या सुविधांचा लाभ घेणारी गावे पहिल्या टप्प्यातील हद्दवाढीत घेणार आहोत. दिवाळी झाल्यानंतर तेथील लोकांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल. कोल्हापूर शहर जिल्ह्याची अस्मिता आहे. महापालिका स्थापन झाल्यापासून आजवर ठराविक मर्यादेतही हद्दवाढ झालेली नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ येथे मिळालेला नाही. यातून कोल्हापूरचा विकास करणे व कोल्हापूर शहर देशातील सर्वोत्कृष्ट शहर करण्याचे स्वप्न साकारण्यासाठी हद्दवाढीसाठी सगळ्यांच घटकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे.’’
ते म्हणाले, ‘‘पुणे, मुंबई, ठाणे आदी शहरांची हद्दवाढ झाली. पुण्यातील हद्दीवाढीनुसार शहरात येण्यासाठी अनेक गावांची स्पर्धाच लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरात गावे समाविष्ट झाल्यास त्याचे कोणते लाभ होतात, सुविधा घेतल्याचे फायदे काय आहेत, हे समजून घेण्याची गरज आहे.’’
इचलकरंजीला दिवसातून दोन वेळा भरपूर व मुबलक शुद्ध पाणी देण्याची जबाबदारी माझी आहे. त्यासाठी प्रयत्नशील आहे, असे श्री. मुश्रीफ यांनी सुळकूड पाणी योजनेसंबधी प्रश्नावर सांगितले. ते म्हणाले, ‘‘यापूर्वी इचलकरंजीला दोन- तीन योजना झाल्या आहेत. पाऊस कमी झाला तेव्हा दूधगंगा नदीतील व धरणातील पाणी संपले. पिण्यासाठीही पाणी नव्हते. ऊस वाळला, असे चित्र ज्या गावात होते तेथील जनता खडबडून जागी झाली. त्यामुळे आपल्या हक्काचे पाणी दुसऱ्याला देण्यासाठी तेथील ग्रामस्थ तयार नाहीत. इचलकरंजीला कृष्णा नदीतून शुद्ध पाण्याची योजना आहे. मागणी केलेली योजना होण्यास वेळ लागेल, म्हणूनच कृष्णा नदीतून मजले गावापासून योजना सुरू आहे, तेथूनच पाणी घेऊ. त्यासाठी कितीही खर्च आला तरी इचलकरंजीला शुद्ध पाणी देऊ.’’
एका प्रश्नावर ते म्हणाले, ‘‘शाही दसरा महोत्सव होणार आहे. तत्पूर्वी रस्त्यांच्या दुरुस्तीचे नियोजन केले आहे.’’ जिल्हाधिकाऱ्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची माहिती पत्रकारांनी पालकमंत्री मुश्रीफ यांना दिली. त्यावर नाराजी व्यक्त करीत मुश्रीफ यांनी सांगितले, की जिल्हाधिकाऱ्यांनी अशी वक्तव्य केली असल्यास व ते खरे असल्यास योग्य कारवाई करू.’’

सुप्रिया सुळे यांच्याविरोधात प्रचार करण्यासाठी अजित पवार नक्की जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. सरकार पडणार, या संजय राऊत यांच्या भविष्यवाणीची मला माहिती नाही; मात्र आमचे सरकार कार्यकाल पूर्ण करेल.
- हसन मुश्रीफ, पालकमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com