सहा जुलैला ठरणार खंडपीठाचा लढा

सहा जुलैला ठरणार खंडपीठाचा लढा

Published on

सर्किट बेंचचा पुढील लढा उद्या ठरणार

खंडपीठ कृती समितीची बैठक : सहा जिल्ह्यांतील पदाधिकारी राहणार उपस्थित

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात होण्यासाठी सहा जुलैला लढ्याचे स्वरूप स्पष्ट हेणार आहे. यासाठी खंडपीठ कृती समितीची बैठक शनिवारी (ता. ६) न्याय संकुलातील बार असोसिएशनमध्ये होणार आहे. यामध्ये कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन व्हावे, याकरिता कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांचे आंदोलन मागील ३८ वर्षांपासून सुरू आहे. सद्य:परिस्थितीमध्ये यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दिपांकर दत्ता यांच्यासोबत कृती समितीच्या शिष्टमंडळाची बैठक झाली होती. त्यानंतर कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी कळविले होते. त्यानंतर कृती समितीने मुख्यमंत्री यांना वेळोवेळी सर्वसाधारण आठ वेळा भेटून विनंती केली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी सरन्यायाधीश यांची भेट घेण्याबाबत काहीही प्रयत्न केल्याचे दिसत नाही. खंडपीठ लढ्यातील सर्किट बेंच स्थापनेचा प्रश्न एका टप्प्यावर अडकून राहिलेला आहे. त्यामुळे खंडपीठाच्या प्रलंबित प्रश्नाबाबत पुढील दिशा ठरविण्यासाठी शनिवारी (ता. ६) सायंकाळी पाच वाजता कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनमध्ये बैठकीचे आयोजन केले आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन तथा खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक ॲड. सर्जेराव खोत यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.