Shaktipeeth Highway : शक्तिपीठाची शक्ती कोणासाठी? 'मुळशी पॅटर्न'सारखी अवस्था झाली, तर त्‍याला कोण जबाबदार?

Nagpur-Goa Shaktipeeth Highway : नागपूरहून गोव्याला जाण्यासाठी या रस्त्याने १८ तास लागतात. शक्तिपीठ महामार्गाच्या निर्मितीनंतर हा प्रवास केवळ आठ तासांवर येणार असल्याचे कारण सांगून सरकार हा मार्ग उभा करीत आहे.
Nagpur-Goa Shaktipeeth Highway
Nagpur-Goa Shaktipeeth Highwayesakal
Updated on
Summary

शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा मुद्दाही महत्त्वाचा आहे. शेतजमीन गेल्यानंतर येणाऱ्या पिढीने काय करायचे?, वडिलोपार्जित जमीन गेली आणि पैसे आले तर ठीक; नाहीतर ‘मुळशी पॅटर्न’सारखी अवस्था झाली तर त्‍याला जबाबदार कोण?

Nagpur-Goa Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाचा घाट सरकारकडून घातला जात आहे. याला दक्षिण महाराष्ट्रातील (South Maharashtra) शेतकरी, महायुतीतील नेते, तसेच मंत्र्यांकडूनही विरोध सुरू आहे. या महामार्गाच्या माध्यमातून धार्मिक पर्यटन स्थळे एकमेकांना जोडणे; तसेच आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न म्हणून हा महामार्ग असला तरी या शक्तिपीठाची ‘शक्ती’ खरी कोणासाठी, असा प्रश्न यातून पुढे येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

What is the Shaktipeeth Highway project?
Shaktipeeth Highway latest update
Sangli farmers oppose Shaktipeeth Expressway
Why is Shaktipeeth Highway facing opposition?
Marathi News Esakal
www.esakal.com