Loksabha 2019 : बळीराजा पक्षातर्फे १६ उमेदवार जाहीर

Loksabha 2019 : बळीराजा पक्षातर्फे १६ उमेदवार जाहीर

कोल्हापूर - देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच शेतीचे प्रश्‍न जैसे थे आहेत. शेतकऱ्यांसह इतर प्रश्‍नांसाठी बळीराजा पक्षातर्फे लोकसभा निवडणूक लढविली जाणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष दिगंबर लोहार यांनी दिली. दरम्यान, पक्षातर्फे 16 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये कोल्हापुरातून किसन काटकर व हातकणंगलेतून बी. जी. पाटील रिंगणात उतरणार आहेत. 

दरम्यान, सुरेश पाटील यांच्या मराठा क्रांती सेनेतर्फेही यापैकी काही उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची घोषणा इचलकरंजीत केली होती. याबाबत पत्रकारांना विचारले असता त्यांचे आणि आमचे बोलणे झाले आहे. त्यानुसार जाहीर केलेले उमेदवार आमच्याच एमबी फॉर्मवर निवडणूक लढविणार असल्याचे लोहार यांनी स्पष्ट केले. कोल्हापूर प्रेस क्‍लब येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. 

लोहार म्हणाले, ‘‘सध्या शेतीचे मोठे प्रश्‍न आहेत. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चानुसार दर मिळत नाही. त्यामुळे, चांगले आणि अभ्यासू लोक संसदेत जाणे अपेक्षित आहे. नागरिकांच्या संविधानिक हक्कांच्या संरक्षणासाठी बळीराजा पार्टी निवडणूक लढविणार आहे.’’ संपर्कप्रमुख शिवाजी माळकर, यशवंत महाडिक, किसन काटकर, दत्तात्रय सुतार उपस्थित होते.

इतर उमेदवार असे
पंजाबराव पाटील (सातारा), संजय पाटील (माढा), गणेश जगताप (बारामती), मोहन घारे (शिरूर), संभाजी गुणहाट (मावळ), पवन हिरे (शिर्डी), संजय पाशीलकर (रायगड), अरुण कनोरे (मुंबई उत्तरपूर्व), खुशबू बेलेकर (नागरपूर), ॲड. शीला ढगे (वर्धा), नंद नरोटे (गडचिरोली), डॉ. धनंजय नालट (अकोला), संजय देशमुख (बुलढाणा) व संजय टेंबरे (भंडारा-गोंदिया).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com