Will all farmers get loan waiver?
esakal
सांगली : शेतकऱ्यांना दिलासा देणारी दोन लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा राज्य शासनाने मोठ्या गाजावाजात (Maharashtra farm loan waiver) केली; मात्र प्रत्यक्षात ही योजना अद्याप निकषांच्या कचाट्यात अडकली आहे. जिल्ह्यातील तब्बल ६२ हजार ५७१ थकबाकीदार शेतकरी आणि १.४७ लाख नियमित कर्जफेड करणारे शेतकरी या दोघांच्याही नजरा सरकारच्या अंतिम निर्णयाकडे लागल्या आहेत. निकष निश्चित झाल्यानंतरच ‘लाभ नेमका कोणाला?’ याचे चित्र स्पष्ट होणार आहे.